अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला, म्हणून भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते – ऍड.प्रकाश आंबेडकर
मुंबई, दि. ४ – जगात भारतीयांकडे संशयीत नजरेने पाहिले जाते मात्र याबाबत कोणीही भारतीय स्वतःला विचारत नाही की आमच्यावर अत्याचार झालेले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करीत आहे. मात्र हे सत्य आहे कि वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत आहेत हे आता आयोध्येत होत आहे. हे सत्य आजही भारतीय मानायला तयार नाही. पुरावे व इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. मात्र निकाल हा तथ्यांवर नसून भावनिकतेवर देण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
राहुल संस्कृती हे इतिहासकार आहे. त्यांनी सांगितले की, अयोध्या ही बौद्ध सांस्कृतिक तसेच बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र होते. अलाहाबाद ( प्रयागराज ) उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर झाला. परिणामी निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला. सर्वोच्च न्यायालयातही इतिहासाला व पुराव्यांना ग्राहय धरले नाही, यातून एक मार्ग काढला जात आहे असे सांगत राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य केले असते की अयोध्या ही पूर्वी साकेत नावाने ओळखली जात होती. या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राम मंदिर निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही राम मंदिराच्या बाजूने निकाल देतो, असे स्पष्ट न्यायालयाने सांगितले असते तर भारतीयांकडे ज्या संशयीत नजरेने पाहिले जाते ते दूर झाले असते. कारण भारतीय आता आपल्याशी खरे बोलायला लागले आहे, असा निकाल त्या ठिकाणी लागला असता. मात्र आताचा निकाल पाहता आजही भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाईल, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.
अध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी
सुरेश नंदिरे राज्य प्रसिद्धी प्रमुख वंचित बहुजन आघाडी
सरकारने डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीची फेररचना केली असून ३० मार्चला यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र, त्यावर नियुक्त केलेल्या अशासकीय सदस्यांवरून आता वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. पुढील तीन वर्षांसाठी ही समिती असेल. समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, उपाध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री आहेत. सदस्य सचिव म्हणून डॉ. कृष्णा कांबळे, इतर […]
निळा झेंडा काढू नका ही विनंती केली म्हणून ४० जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत या संतापजनक प्रकराचा ऑल इंडिया पँथर सेना जाहीर निषेध करतो. लातूर साकोळा येते भीमाकोरेगाव शौर्य दिनी निळा झेंडा समाजबांधवाने उभा केला होता. गावात इतरही झेंडे आहेत परन्तु पिडब्लडी केवळ निळ्या झेंड्याला विरोध करते, पोलीस यंत्रणा फोर्स घेऊन झेंडा काढायला […]
रक्ताच्या थारोळ्यात जीवन मरणाशी झुंज सुरू… पुन्हा महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आली आहे सादर प्रकरण हे सायन कोळीवाडा मुंबई इथली आहे, प्रेमाच्या नावाखाली त्याने अफाट छळ केला. भांडण एवढं भयानक की ६ वेळा जबर मारहाण करण्यात आली. कधी तोंड फोडलं, कधी मुका मार दिला, कधी कामाच्या ठिकाणी जाऊन मारलं तर कधी रस्त्यावर मारलं. अफाट शोषण […]