रिपब्लिकन पक्षाची अधिकृत स्थापना दि. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी झाली असली, तरी त्याला साधारणतः १९२४ सालच्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या स्थापनेपासूनची परंपरा आहे. या परंपरेच्या पार्श्वभूमीनेच त्याला काही व्यापक आणि महत्वाचे संदर्भ दिलेले आहेत. या पूर्वी सांगितल्या प्रमाणे, बाबासाहेबांना भारतीय समाजाला आधुनिक जगाशी, त्याच्या आधुनिक समाज आणि राजकीय व्यवस्थेशी, त्याच्या आधुनिक जीवनमूल्यांशी संवादी बनवायचे होते. त्यासाठी पोषक असे वैचारिक […]
Author: आंबेडकरी चळवळ टीम
शेकडो वर्षे थांबून सुद्धा जे कार्य झाले नसते ते या दहा वर्ष्याच्या अल्पावधीत झाले आहे : जनता
दिनांक ३ मे १९३६ रोजी नागपूर म्युनिसीपालिटीच्या मानपत्र समारंभानंतर संध्याकाळी नागपूरच्या अस्पृश्य बांधवांची जाहीर सभा कस्तुरचंद पार्कमध्ये झाली. यावेळी हजारो अस्पृश्य बंधुभगिनी हजर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकाराने नागपूर शहर हादरून गेले होते. डॉक्टर साहेबांवर नथीतून तीर मारणारे टीकाकार व पुढारी नागपुरातून कुठे निघून गेले होते, त्यांचा पत्ता नव्हता. डॉक्टरसाहेबांच्या प्रेमामुळे, त्यांच्यावरील पूर्ण विश्वासामुळे सर्वस्वाला विसरून कार्य करण्याला सज्ज झालेला […]
कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज व चहा प्रकरण
कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज व चहा प्रकरण गंगाराम कांबळे नावाच्या एका अस्पृश्यांला तत्कालीन महार समाजाच्या नागरिकास महाराजांनी कोल्हापूरच्या राज रस्त्यावर हॉटेल सुरू करण्यासाठी जागा दिली,भांडवलही दिले व कांबळेचे “सत्यसुधारक” नावाचे हॉटेल सुरू झाले. दुकान तर सुरू झाले पण महाराच्या हातचा चहा कोण पिणार, गंगारामला काय करावे सुचेना शेवटी ही गोष्ट महाराजांन पर्यंत गेली त्यावर महाराजांनी […]
एक विद्रोही कवी…नामदेव ढसाळ….!!!
आज काल मन फार हेलावून जाते जेव्हा कोणी म्हणते की नामदेवाने पॅंथर काढून चळवळीची वाताहत करुन टाकली. नामदेवाच्या विद्रोहाला शिव्या देणार्यांच्या भ्याड विरोधाला मी तीळमात्र भीक घालत नाही. कारण ढसाळांच्या विद्रोहात सर्व काही “क्षम्य” असते आणि आहे शिवाय कायम राहील. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे […]
नामांतराच्या जखमा
वयाने चाळिशी ओलांडली की वार्धक्याकडे प्रवास सुरू होतो, असे म्हणतात. वार्धक्य हे तसे सर्वार्थाने दूर्लक्षित जीवन. मग ते मानवी जीवन असो की, निर्जीव वास्तूचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. जगात सगळ्यात जास्त गाजलेलं नाव. तेथील विद्यादानाच्या अद्भूत पद्धतीमुळे नव्हे तर.. मानवी अधिकारा मिळवण्यासाठई झालेल्या संघर्षामुळे. विद्यापीठाचे नाव समोर आले की चित्र उभे राहते ते ऐतिहासिक […]
रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग – २
रिपब्लिकन पक्षाच्या आजच्या स्वरूपाची आणि त्याच्या भवितव्याची चर्चा करण्यापूर्वी त्याच्या स्थापनेमागील प्रयोजन आणि त्याच्या संस्थापकांचा व्यक्तिमत्वाची माहिती घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय हि चर्चा कल्याणकारी आणि अर्थपूर्ण होऊ शकणार नाही. तसे करणे म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचा देदीप्यमान वारसा समजून घेणे होय, ज्यांना तो वारसा नीट माहित नसतो त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन होऊ शकणार नाही. या […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-३)
बाबरी मशिद याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभ राहिले. ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने बाबरी मशिदआंदोलन म्हणजे उच्चवर्णियांच्या हिंदु संघटनेचा राजकीय उठाव या सवर्ण हिंदू संघटनांनी जसा बाबरी मशिद प्रश्न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्न उपस्थित केला. राखीव जागेच्या प्रश्नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या […]
श्रामणेर दिक्षा बंधनकारक करा…!
माणुस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा माणुस फक्त माणुसच असतो. नंतर तो त्याच्या संबंधीत धर्माचा होतो आणि त्यासाठीच प्रत्येक धर्माने आपली स्वत:ची अशी धार्मिक विधी निर्माण केली आहे. क्रिश्चन धर्मिय त्याला बाप्टिसम म्हणतात, मुस्लिम धर्मात त्याला खतना म्हणतात. एवढेच नव्हे, तर ब्राम्हण समाजात सुद्धा कोणी ब्राह्मण कुटुंबांत जन्माला आला म्हणुन ब्राह्मण होत नाही, तर जेव्हा ब्राह्मण […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-२)
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-२) सतरा लाख मतदार लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीची ताकद तिला मिळणाऱ्या मतदानातून दिसते. निवडणूक हे साधन आहे. निवडणुकीमध्ये हे सामर्थ्य दाखविणे आवश्यक असते. आंबेडकरी चळवळ जी निवडणुकीपासून कोसभर दूर गेली होती. एवढेच नव्हे, तर समझोत्याच्या राजकारणापायी स्वत:चे राजकीय […]
आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर
आंबेडकरी चळवळ संपली आहे…… डॉ. वाबासाहेब आंबेडकरांनी आपली चळवळ कशी उभी केली; याचा शोध घेण्याचा मी एक प्रयत्न केला तो माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे त्यानिमित्ताने, मी १९८० साली पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण या जिल्ह्यांचा दौरा केला. जुन्या माणसांशी बोललो. त्यांनी बाबासाहेबांच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केळे, आठवणी सांगितल्या. बाबासाहेबांची ज्यावेळी चावडीत बैठक चालू असायची […]


